या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि प्राचीन मध्ययुगीन काळातील हे एक गाव आहे. हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून रिकामं झालं आहे. पण, इथल्या जुन्या घरांची दुरुस्ती गरजेची आहे. या घरांमध्ये लोक राहत नसल्याने काही घरं जीर्ण अवस्थेत असून ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे या घरांचा स्वस्त दरात लिलाव होत आहे, पण घर खरेदी करणाऱ्यांना ते दुरुस्त करावं लागेल.
पण, एक अट असणार आहे. ही घरं खरेदी करणाऱ्यांना 5000 युरो म्हणजेच सुमारे 4.3 लाख रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावे लागतील. जेव्हा घराची दुरुस्ती पूर्ण होईल, तेव्हा हे पैसे देखील खरेदीदारांना परत केले जातील. घर घेणारे याचा खासगी किंवा व्यावसायिक वापर करणार असल्याची माहिती सरकारलाही द्यावी लागेल. या औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, घर खरेदीदाराच्या नावावर होईल.