Weight Loss कमी करण्याचा सोपा उपाय; फक्त सकाळच्या काही सवयी बदला
वजन खूप वाढल्यानंतर (Weight Gain) त्याकडे लक्ष देण्यापेक्षा वेळीच काही बदल केलं तर, डायटिंग, जिम करण्याची वेळच येणार नाही.
|
1/ 8
वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं.
2/ 8
वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं. सकाळी उठल्यावर आपण काही चुकीच्या गोष्टी करत असलो तर, त्याने वजनवाढीची समस्या निर्माण होते. हल्दी राहण्यासाठी हेल्दी सवई लावायला हव्यात.
3/ 8
सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट प्याणी प्या. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो. रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिणंही फायदेशीर आहे.
4/ 8
पॅक्ड ज्युस पिण्याऐवजी फेश ज्युस प्या. पॅक्ड ज्युस प्रोसेस केलेले असतात. त्यात प्रिझर्वेटीव्ह असल्याने याचा शरीराला कोणताही फायदा होण्यापेक्षा नुकसान होते.
5/ 8
गडबडीमुळे नाश्ता न करता घारबाहेर पडण्याची काहींना सवय असते. काहीजण धावपळ करत नाश्ता कतरतात. त्यामुळे मेटाबॉलिजम स्लो होतं. कितीही गडबड असली तरी, थोडा वेळ काढून नाश्ता करा.
6/ 8
काही लोक जास्त खाऊन घराबाहेर पडतात. त्यातही पचायला जड पदार्थ खाल्याने त्यातून कॅलरीज वाढतात. जास्त कॅलरीचं अन्न सकाळी खाल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.
7/ 8
घरामधून नाश्ता करुन न निघाल्याने भूक लागल्यावर काहीजण बाहेरचं अन्न खातात. काही वेळेला जंकफूडही खातात. बाहेर मिळणारे पदार्थ चांगल्या तेलात बनवलेले असतीलच असं नाही.
8/ 8
भूक लागल्यावर बिस्कीटांसारखे पदार्थ खाणंही टाळा. त्यात जास्त प्रमाणात मैद्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे शक्यतो घरामधून खाऊनच निघा.