पावसाळ्यातले आजार पळवाचे असतील तर; हे 2 पदार्थ एकत्र खा! लगेच होईल फायदा
आयुर्वेदात सांगितलेली काही फूड कॉम्बिनेशन्स जालीम उपाय ठरतात. सर्दी, खोकला होऊ नये म्हणून इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तर हे पदार्थ एकत्र खाल्ल्यास आणखीन फायदा होतो.
|
1/ 8
काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, बीटा केरोटीन, व्हिटॅमिन ए, एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म, अँटीऑक्सिडेंट्स, सेलेनियम असतात, तर खडी साखरेत व्हिटॅमिन बी 12,फायबर,अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.
2/ 8
जेवणाचं चांगलं पचन व्हावं यासाठी कहीजण खडीसाखर आणि बडीशेप खातात, पण, गॅस,बद्धकोष्ठता,अपचना समस्या, सूज येणं किंवा पोट फुगणं अशा तक्रारी असल्यास मिरपूड बरोबर खडीसाखर खावी. पचन संबंधीत सर्व समस्या दूर होतील.
3/ 8
स्मरणशक्ती कमकुवत झाली असेल किंवा मानसिक तणाव जाणवत असेल तर त्या व्यक्तीने मिरपूड आणि खडीसाखर खावी. याने मानसिक थकवा दूर होईल आणि स्मरणशक्तीही चांगली होईल.
4/ 8
मिरपूड आणि खडीसाखरेच्या सेवनाने झोपेची समस्या देखील दूर होते. फ्रेश वाटत नसेल तर,आपलं मन ताजतवान करण्यासाठी हे मिश्रण खा.
5/ 8
मिरपूडच्या वरच्या थरांवर फायटोन्यूट्रिएंट्स असत,जे शरीरातील चरबीच्या पेशी तोडण्याचं काम करतात. काळी मिरी आणि खडीसाखर एकत्र खाल्ली तर, वजन कमी करण्यास मदत होते.
6/ 8
खडीसाखर पोट निरोगी ठेवण्यासाठी आणि भूक नियंत्रण करण्यांच काम करते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर, मिरपूड आणि खडीसाखरेचं मिश्रण खाऊ शकता.
7/ 8
खडीसाखर आणि तुपाचे काही थेंब काळी मिरीच पावडरमध्ये मिसळून खाल्ल्यास आपल्या घशात आराम मिळेल. या चाटणाने खोकल्यामध्ये त्वरित आराम मिळतो. काळी मिरी घशातील कफ काढून टाकण्यासाठी खूप मदत करते.
8/ 8
मिरपूड आणि खडीसाखर यांचं मिश्रण घेतल्याने तणाव कमी होतो आणि शरीराला त्वरित उर्जा देखील मिळते. यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होऊ शकतो.