प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. विश्वासघात हा प्रेमासाठी खूप घातक आहे. ब्रेकअप झाल्यानंतर त्या नात्यातून बाहेर पडणं कठीण जातं. परंतु याच ब्रेकअपमुळे माणूस अधिक खंबीर होतो. त्यामुळे आपल्या जीवनात थोडेफार फायदेसुद्धा होतात.
ब्रेकअप झाल्यानंतर माणसांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट नावाचा प्रकार येतो. कारण ब्रेकअप झाल्यामुळे एकमेकांवर असलेल्या रागामुळे आपलंच बरोबर आहे, असा प्रत्येकाचा समज असतो. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता अधिक बळकट होते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुलांपेक्षा मुली ब्रेकअप झाल्यावर स्वत:ला लवकर सावरतात. मुलांना यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. ब्रेकअप झाल्यामुळे तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीवर लवकर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही मनाला आवडेल ते करू लागता.
दैनंदिन आयुष्यात तुम्हाला त्या व्यक्तीची सवय झाली असते. त्यामुळे अचानक त्याच्या जाण्याने तुम्ही दुखावता, परंतु याचा फायदा तुमच्यातील असलेल्या कलेला वाव देण्यासाठी होऊ शकतो. एकांत हा माणसाला खूप शिकवतो. ब्रेकअपनंतर तुम्ही एकटे पडता. अशा परिस्थितीत तुम्ही स्वत:ला बिझी ठेवण्यासाठी तुमच्या कामाला महत्त्व देऊ शकता.
एकदा प्रेमात विश्वासघात झाल्याने पुन्हा माणूस ती चूक करत नाही. त्या व्यक्तीची जगण्याची उद्दिष्ट्यं बदलेली असतात. त्यामुळे त्याचा परिणाम खाण्यावर होतो. तुमच्या आहारात खूपच फरक पडतो. काहींना भूक लागत नाही, तर काहींना जास्त प्रमाणात भूक लागते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार माणूस 30 वर्षांपर्यंत यातून बाहेर पडत नाही. ब्रेकमधून बाहेर पडल्यावर तो आपल्या घरातील जबाबदाऱ्यांकडे जास्त लक्ष देतो.