Chanakya Niti: लहान वयात मुलांवर करा ‘असे’ संस्कार; प्रगतीपासून रोखू शकणार नाही
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीति (Niti) आपल्याबरोबर मुलांचा प्रगतीसाठीही उपयोगी आहेत. मुलांवर कसे संस्कार करावेत हे त्यांनी सांगितलं आहे.
आचार्य चाणक्य यांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलं. ते स्वतः तक्षशिला विश्वविद्यापिठात विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते. याचा कळात चाणक्य यांनी मुलांचं संगोपन करताना पाळावयाचे नियम सांगितले आहेत.
2/ 7
आचार्य चाणक्य सांगतात मुलांना लहान वयामध्ये त्यांच्या चांगल्या गुणांची जाणीव करायला हवी. लहान वयात मुलांवर केलेले संस्कार शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहतात. याच काळात लहान मुलांना वाईट सवयी देखील लागू शकतात. त्यामुळे पालकांनी जागृत असायला हवं.
3/ 7
लहान वयात मुलांना खोटं बोलण्याची सवय लागू शकते. खोटं बोलण्याची सवय अत्यंत घातक असते. त्यामुळे मुलांना या सवयीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
4/ 7
मुलांना मेहनतीने यश मिळवण्याची सवय लावायला हवी. मेहनतीमुळे मिळवलेलं यश किती आनंद देत याची माहिती मुलांना लहान वयात द्यावी. त्यामुळे ते देखील मेहनतीने, परिश्रमाने यश मिळवण्याचा प्रयत्न करतात.
5/ 7
मुलांना बालपणातच शिस्तीचे धडे द्यायला हवेत. सकाळी लवकर उठणे, लवकर झोपणे, वेळेत अभ्यास करणे, स्वतःची कामं स्वतः करणे अशा सवयी मुलांना बालपणात लागल्या तर त्यांचा आयुष्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो.
6/ 7
लहानपणी जरी मुलं आई वडिलांचा हात धरून चालत असले तरी, मोठे झाल्यानंतर त्यांना पंख पसरून या जगात उडावं लागतं. त्यामुळे वेळीच मुलांना चांगल्या सवयी लावायला हव्यात.
7/ 7
मुलांना लागलेल्या वाईट गोष्टी त्यांच्या प्रगातीचा अडथळा होतात. त्यांना आलेल्या संकटांना तोडं देतांनापण त्यांची साथ दिली तरी, योग्य वयातले संस्कार त्यांना अडचणीमधून बाहेर काढतात.