झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' ( tuzyat jiv rangala ) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र आजही या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षक मिस करतान दिसतात. या मालिकसोबत यातील कलाकारांसोबत प्रेक्षकांच्या खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. यातील अंजली बाई आणि राणादाच्या ऑनस्क्रीन जोडीने रसिकांची भरपूर पसंती मिळवली होती. राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर याच मालिकेमुळे दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली.
आता राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर या जोडीसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही ऑनस्क्रीन जोडी आता आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एंगेज झाली आहे. हो विश्वास बसणार नाही पण ही बातमी खरी आहे.
आज अक्षय तृतीयाच्या दिवशी या जोडीनं आपलं नातं सर्वांसमोर जाहीर करत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर या दोघांनी साखरपुड्याचे
अक्षया देवधरनं तिच्या इन्स्टावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, Finally Engaged.💍♥️#अहा ऽऽऽऽ #Aha ऽऽ #Engaged.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. हार्दिक जोशी सध्या झी मराठीवरील मालिकेत दिसत आहेत. या दोघांना आजही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसते.
हार्दिक जोशी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..या झी मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अधून मधून हे दोघे एकादे रील्स शेअर करत असता. प्रेक्षकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळतो.
चाहत्यांना मात्र साखरपुड्याचे फोटो शेअर करत सुखाचा धक्का दिला आहे. ( फोटो साभार- अक्षया देवधऱ इन्स्टा)