14 जून रोजी संपूर्ण बॉलिवूडला धक्का देणारी ही घटना घडली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरी मृतावस्थेत आढळून आला.
दरम्यान या घडामोडीनंतर अभिनेत्री कंगना रणौतने नेपोटिझम या विषयाला हात घालत बॉलिवूडमधील अनेकांवर गंभीर आरोप केले होते.
सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
18 जूनला सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्ती बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता हजर झाली होती. वांद्रे पोलिसांनी रियाची तब्बल 10 तास चौकशी केली
20 जून रोजी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी 14 जणांचे जबाब नोंदवले. यामध्ये त्याचे कुटुंबीयांचा समावेश होता.
21 जून रोजी बिहार कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुजफ्फरपूर याठिकाणी राहणाऱ्या कुंदन कुमार यांनी मुख्य न्यायिक दंडाधिकारी यांच्या समक्ष याचिका दाखल केली होती.
20 जूनपर्यंत पोलिसांनी 23 जणांची चौकशी केली होती. त्यांनतर पोलीस सुशांतच्या ट्विटर अकाऊंटवरून आत्महत्येपूर्वी केलेल्या ट्विटचा शोध घेत होते पिंकविलाच्या अहवालानुसार पोलिसांना असा संशय आहे की, सुशांतच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही ट्विट गायब होते. पोलिसांनी ट्विटरकडून काही गोपनीय माहिती मागवली होती.
27 जून रोजी सुशांतचे वायआरएफ बरोबर असणाऱ्या काँट्रॅक्ट संदर्भात यश राज फिल्म्सच्या माजी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले.
30 जून रोजी सुशांतच्या शेवटच्याा सिनेमात त्याची सहकलाकार असणारी संजना सांघी हिची देखील चौकशी करण्यात आली. सूशांतवर करण्यात आलेल्या मीटू आरोपाबाबत काही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती.
जून अखेरपर्यंत संजना सांघी, सुशांतचे कुटुंबीय, कंटेट मॅनेजर सिद्धार्थ पिठानी, त्याचा केअर टेकर दीपेश सावंत, सुशांतची जवळची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती, YRF चे कास्टिंग डिरेक्टर इ. अशा एकूण 30 जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आले होते.
18 जुलै रोजी वायआरएफचे चेअरमन आदित्य चोप्राचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांच्या जबाबामध्ये विरोधाभास होता.
या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये चाहत्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी वारंवार केली जात होती. त्याचप्रमाणे बिहारमधील काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती.