शाहरूख खानची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. बॉलिवूडचा किंग खान त्याच्या सिनेमा इतकाच त्याच्याशी संबंधीत Controversy मुळं चर्चेत असतो. मात्र संकंट कितीही मोठ असो शाहरूख नेहमी त्याचा धिटानं सामना केला आहे.
कधी धर्मावरून तर कधी दिपीकाच्या बिकीनीच्या रंगावरून पठाण सिनेमाला ट्रोल केलं ..पण शाहरूखनं प्रकरण संयमानं हाताळलं.
शाहरूख नेहमीप्रमाणे या प्रकरणात काही न बोलता शांत राहिलं. खरं तर त्याचं शांत राहणं हेच यावर उत्तर होतं.
शाहरूखचा मुलगा प्रकरण ड्रग्ज केसमध्ये अडकला होता. तेव्हा देखील शाहरूखवर सातत्याने टीका केली जात होती.
मुलगा जेलमध्ये असताना देखील त्यानं याप्रकरणाचा कसालाही बाऊ न करता प्रकरण शांतपणे हाताळलं. शेवटी आर्यन तुरूंगातून निर्दोष बाहेर पडला.
मोठा स्टार होणं अवघड नाही तर ते स्टारडम ठिकवूण ठेवणं अवघडं आहे. शाहरूखनं देखील या त्याच्या एका गुणामुळं त्याचं स्टारडम टिकवून ठेवलं आहे.