शाहरुख खान- 2015 मध्ये शाहरुख खानच्या शेजाऱ्यांनी त्याच्यावर सार्वजनिक जागी अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. त्याच्या 'मन्नत' या बंगल्याजवळ वॅनिटी पार्क करण्यासाठी बांधण्यात आलेला रँप अवैध असल्याचा आरोप होता. 6 फेब्रुवारीला त्याला तो रँप तोडण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली, तर 14 फेब्रुवारी रोजी रँप तोडण्यात आला. शाहरुखने याबाबत मार्च महिन्यामध्ये 1.93 लाखाचा दंड देखील भरला आहे.
कपिल शर्मा- 4 ऑगस्ट 2016 रोजी कपिल शर्माच्या वर्सोवा येथील बंगल्याशेजारील अवैध बांधकामाची बीएमसीने तोडफोड केली होती. 16 जुलै रोजी त्याला याठिकाणचे बांधकाम थांबवण्याची नोटीस पाठवण्यात आली होती, पण त्याला काही उत्तर न मिळाल्याने बीएमसीने ही कारवाई केली. मुंबई हायकोर्टाने 17 ऑक्टोबर 2016 ला बीएमसीच्या नोटीशीला स्थगिती दिली होती.
अरशद वारसी- बीएमसीने 19 जून 2017 मध्ये अरशद वारसीच्या वर्सोवा येथील बंगल्यावर कारवाई केली होती. बीएमसीने अवैधपणे बांधण्यात आलेल्या एका मजल्यावर कारवाई केली होती. 17 जून रोजी एयर इंडिया को-ऑपरेटिव सोसायटीच्या बंगला नंबर 10ला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये अरशद वारसीला दुसरा मजल्याचे अवैध बांधकाम हटवण्यासाठी 24 तासाचा कालावधी देण्यात आला होता. त्याच्याकडून नोटीशीला उत्तर न आल्याने बांधकाम अखेर तोडण्यात आले.