बॉलिवूडमध्ये काही शाहरुख खान-गौरी खान, काजोल-अजय देवगणसारखे कपल्स आहेत, ज्यांनी एकाच व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत संसार टिकवला. तर काही कपल्स असे आहेत ज्यांनी लग्न तर थाटामाटात केलं मात्र ते वर्षभरही टिकवलं नाही. आज आपण अशाच काही सेलिब्रेटींबाबत जाणून घेणार आहोत.
या लिस्टमध्ये सर्वात आधी नाव येतं बिपाशा बसूचा नवरा करण सिंग ग्रोव्हरच. करणने बिपाशासोबत तिसरं लग्न केलं आहे. याआधी त्याने दोन लग्न केली होती. परंतु अभिनेत्याचं पहिलं लग्न १० महिनेसुद्धा टिकलं नाही. करणने अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत पहिलं लग्न केलं होतं.
करण सिंग ग्रोव्हरने अभिनेत्री जेनेफर विंगेटसोबत दुसरं लग्न केलं होतं मात्र ते लग्नसुद्धा जास्तकाळ टिकलं नाही. आज करण बिपाशासोबत संसार करत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना एक मुलगीही झाली आहे.
'बिदाई' फेम अभिनेत्री सारा खान आणि अली मर्चंटचं लग्न संपूर्ण देशाने पाहिलं होतं. कारण या जोडप्याने 2010 मध्ये 'बिग बॉस'च्या घरात लग्न केलं होतं. पण 2 महिन्यांतच त्यांच्या लग्नात अडचणी येऊ लागल्या होत्या. सारा आणि अलीला समजलं की त्यांचं लग्न फार काळ टिकणार नाही. 2011 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला होता.
अभिनेत्री मंदाना करीमी चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते. मंदाना करीमीने 2017 मध्ये बॉयफ्रेंड गौरव गुप्तासोबत लग्न केलं होतं. गौरव गुप्ता हा मुंबईस्थित उद्योगपती आणि अभिनेता गौतम गुप्ता यांचा भाऊ आहे. या जोडप्याने 2017 मध्ये आधी कोर्ट मॅरेज आणि नंतर ग्रँड वेडिंगही केलं होतं.
मंदाना करीमीने कंगना राणौतच्या 'लॉकअप' या शोमध्ये खुलासा केला होता की, तिचा पती गौरव गुप्ताचे अनेक अभिनेत्रींसोबत विवाहबाह्य संबंध होते. मंदाना करीमी आणि गौरव गुप्ता 2017 मध्येच विभक्त झाले होते. आणि 4 वर्षे वेगळे राहिल्यानंतर 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.
अभिनेता पुलकित सम्राटने 2014 मध्ये सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. पण लग्नानंतर वर्षभरातच या जोडप्याचा घटस्फोट झाला. या जोडप्याच्या घटस्फोटाचे कारण अभिनेत्री यामी गौतम असल्याचं सांगितलं जातं.
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी 1990 मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवालशी लग्न केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर लगेचच दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. रेखासोबत लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली होती.