बिग बॉस मराठीमध्ये मीरा,उत्कर्ष, जय आणि गायत्री यांच्यामध्ये फारच चांगली मैत्री झाली होती. शोच्या शेवटच्या टप्प्यात गायत्री या ग्रुपमधून बाहेर पडली. शो संपल्यानंतरही या तिघांची मैत्री दिसून येत आहे.
उत्कर्ष आणि जय मीराला आणि तिच्या कुटुंबाला भेटायला तिच्या घरी गेले होते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये जय आणि उत्कर्ष मीरा आणि तिच्या संपूर्ण कुटूंबासोबत दिसून येत आहेत.
बिग बॉस मराठीमध्ये मीरा जग्गनाथ आपल्या फटकळ स्वभावामुळे ओळखली जाते. शोमध्ये मीरा नेहमीच सर्वांचा पाणउतारा करताना दिसली आहे.
परंतु शो च्या शेवटी तिच्या आयुष्यातील काही घटनांनी सर्वांनाच भावुक केलं. या गोष्टींमुळे सर्वांना एक नवी मीरा पाहायला मिळाली.
मीरा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी अक्षरशः वेडी होती. तिने आपल्या कुटूंबाचा विरोध पत्करून या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.
त्यामुळे तिचे वडील अनेक वर्ष तिच्याशी बोलत नव्हते. परंतु बिग बॉस मराठीने या बाप लेकीमधील सर्व कटुता दूर केली आहे.
आज मीरा पुन्हा एकदा आपल्या घरी जाऊ शकतेय. ती पुन्हा आपल्या बाबांसोबत बोलत आहे. त्यामुळे ती फारच खुश आहे.