advertisement
होम / फोटोगॅलरी / क्राईम / हुंड्याने घेतला असहाय्य बापाचा जीव; नवरदेवाच्या एका निर्णयामुळे अख्ख कुटुंब उद्ध्वस्त

हुंड्याने घेतला असहाय्य बापाचा जीव; नवरदेवाच्या एका निर्णयामुळे अख्ख कुटुंब उद्ध्वस्त

मुलीचे वडील सजलेल्या मंडपात वरातीची प्रतीक्षा करीत होते. मात्र संध्याकाळ झाली तरी वरात काही आलीच नाही

01
लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. लग्नाच्या दिवशी ती अगदी आतूरतेने आपल्या नवरदेवाची वाट पाहत असते. मात्र जर सजलेल्या मंडपात वरात आलीच नाही, तर त्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल, याचा आपण विचारही करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात अशीच घटना समोर आली आहे. येथे हुंडा न दिल्यामुळे सजलेल्या मंडपात वरात आली नाही. वरात आली नाही म्हणून नवरी घरातून निघून गेली. यानंतर अख्खं घर उद्ध्वस्त झालं.

लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. लग्नाच्या दिवशी ती अगदी आतूरतेने आपल्या नवरदेवाची वाट पाहत असते. मात्र जर सजलेल्या मंडपात वरात आलीच नाही, तर त्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल, याचा आपण विचारही करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात अशीच घटना समोर आली आहे. येथे हुंडा न दिल्यामुळे सजलेल्या मंडपात वरात आली नाही. वरात आली नाही म्हणून नवरी घरातून निघून गेली. यानंतर अख्खं घर उद्ध्वस्त झालं.

advertisement
02
ही संपूर्ण घटना फतेहपूरमधील बिंदकी पोलीस हद्दीतील पुरवा गावातील आहे. येथे 45 वर्षीय राम सुफल निषाद यांची मुलगी माला हिचं लग्न हमीरपूर जिल्ह्यात ठरवलं होतं आणि 6 डिसेंबर रोजी वरात येणार होती. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने वरात वधुच्या दारात आलीच नाही.

ही संपूर्ण घटना फतेहपूरमधील बिंदकी पोलीस हद्दीतील पुरवा गावातील आहे. येथे 45 वर्षीय राम सुफल निषाद यांची मुलगी माला हिचं लग्न हमीरपूर जिल्ह्यात ठरवलं होतं आणि 6 डिसेंबर रोजी वरात येणार होती. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने वरात वधुच्या दारात आलीच नाही.

advertisement
03
पीडित वडिलांनी या घटनेची लिखित तक्रार एसपी यांच्याकडे दिली. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला. या घटनेत नवीन वृत्त समोर आले. गुरुवारी सायंकाळी वधु अचानक घरातून गायब झाली. रात्री उशिरापर्यंत राम सुफल यांची मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पीडित वडिलांनी या घटनेची लिखित तक्रार एसपी यांच्याकडे दिली. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला. या घटनेत नवीन वृत्त समोर आले. गुरुवारी सायंकाळी वधु अचानक घरातून गायब झाली. रात्री उशिरापर्यंत राम सुफल यांची मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

advertisement
04
या प्रकरणात मृत व्यक्तीची मोठी मुलगी प्रीती देवी हिचा आरोप आहे की, मनोहर पोलीस ठाणे हद्दीतील हमीरपूर येथील निवारी छैदू यांच्यासोबत लग्न ठरलं होतं. मात्र ते वरात घेऊन आले नाही. ज्यामुळे वडील निराश झाले. त्यातच लग्नाच्या दिवशी सायंकाळी जंगलात गेलेली मुलगी अचानक गायब झाली. रात्री उशिरा मुलगी घरी आली नाही म्हणून वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणात मृत व्यक्तीची मोठी मुलगी प्रीती देवी हिचा आरोप आहे की, मनोहर पोलीस ठाणे हद्दीतील हमीरपूर येथील निवारी छैदू यांच्यासोबत लग्न ठरलं होतं. मात्र ते वरात घेऊन आले नाही. ज्यामुळे वडील निराश झाले. त्यातच लग्नाच्या दिवशी सायंकाळी जंगलात गेलेली मुलगी अचानक गायब झाली. रात्री उशिरा मुलगी घरी आली नाही म्हणून वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

advertisement
05
या संपूर्ण प्रकरणात एसपी सतपाल अंतिल यांनी सांगितलं की, पुरवा गावातून आत्महत्येचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर तेथे जाऊन तपास करण्यात आला. मृत व्यक्तीचं नाव राम सुफल असून त्यांच्या कुटुंबात सात मुली आणि तीन मुलगे आहेत.

या संपूर्ण प्रकरणात एसपी सतपाल अंतिल यांनी सांगितलं की, पुरवा गावातून आत्महत्येचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर तेथे जाऊन तपास करण्यात आला. मृत व्यक्तीचं नाव राम सुफल असून त्यांच्या कुटुंबात सात मुली आणि तीन मुलगे आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. लग्नाच्या दिवशी ती अगदी आतूरतेने आपल्या नवरदेवाची वाट पाहत असते. मात्र जर सजलेल्या मंडपात वरात आलीच नाही, तर त्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल, याचा आपण विचारही करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात अशीच घटना समोर आली आहे. येथे हुंडा न दिल्यामुळे सजलेल्या मंडपात वरात आली नाही. वरात आली नाही म्हणून नवरी घरातून निघून गेली. यानंतर अख्खं घर उद्ध्वस्त झालं.
    05

    हुंड्याने घेतला असहाय्य बापाचा जीव; नवरदेवाच्या एका निर्णयामुळे अख्ख कुटुंब उद्ध्वस्त

    लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. लग्नाच्या दिवशी ती अगदी आतूरतेने आपल्या नवरदेवाची वाट पाहत असते. मात्र जर सजलेल्या मंडपात वरात आलीच नाही, तर त्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल, याचा आपण विचारही करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात अशीच घटना समोर आली आहे. येथे हुंडा न दिल्यामुळे सजलेल्या मंडपात वरात आली नाही. वरात आली नाही म्हणून नवरी घरातून निघून गेली. यानंतर अख्खं घर उद्ध्वस्त झालं.

    MORE
    GALLERIES