राज्यात कोरोना लॉकडाऊन पुन्हा लागू होईल की नाही? याचा निर्णय आता 8 दिवसांनंतरच होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला इतक्या दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 8 दिवसांमधील परिस्थिती पाहूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र तोपर्यंत जिथं कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढली आहेत, तिथल्या स्थानिक प्रशासनानं मात्र कठोर पावलं उचलली आहेत.