देशभरात कोरोनाच्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घ्यायलाही प्रचंड उशीर होत असल्याचं त्यामुळं समोर येतंय. महाराष्ट्रात तर 18-44 वयोगटातील लसीकरणाला ब्रेकच लागला आहे. या सर्व मु्द्द्यांवरून केंद् सरकारवर विविध आरोप होत आहेत. देशातील नागरिकांना लस नसताना विदेशामध्ये लसींचे डोस का पाठवले असा सवाल मोदींना विचारला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील घाटकोपर याठिकाणी अशाप्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली आहे