ही घटना सतना शहरातील मारुती नगर येथील आहे. येथील रहिवासी वशिष्ठ मुनी त्रिपाठी यांची मुलगी शिवानी त्रिपाठी (25) हिचा विवाह विराटनगर पटेरी सत्यनारायण पयासी यांचा मुलगा अभिषेक पयासी (28) याच्याशी झाला. 10 मे रोजी ही वरात मोठ्या थाटामाटात मारुती नगरमधील एका खाजगी वाड्यात पोहोचली. याठिकाणी वधू-वरांचे लग्न झाले.
यानंतर 11 मे रोजी सकाळी वधूची सासरी पाठवणी होणार होती. परंतु, वधूची शिक्षक भरतीची परीक्षा होती. त्यामुळे वधू-वर दोघांच्याही कुटुंबीयांनी ही परीक्षा देण्याचे मान्य केले. निरोप समारंभाच्या आधी, वधू सकाळी 7:00 च्या सुमारास आदित्य महाविद्यालयात पोहोचली आणि सकाळी 9:00 ते 12:00 वाजेपर्यंत तिने पूर्ण 3 तासांची परीक्षा दिली.
विशेष म्हणजे नववधू निरोपाच्या आधी परीक्षा देण्यासाठी गेली आणि 5 तासांहून अधिक काळ वर अभिषेक त्रिपाठी आणि सासरचे लोक नवरी परत येण्याची वाट पाहत होते. परीक्षा देऊन वधू लग्नस्थळी परतली तेव्हा तिचा निरोप समारंभ पार पडला.
वधू शिवानी त्रिपाठी म्हणते की, ती परीक्षेबद्दल खूप आनंदी आहे आणि कुटुंबाने तिला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आधी परीक्षा आणि नंतर निरोपाचा कार्यक्रम असे पती आणि सासरच्या मंडळींनी सांगितले होते. लग्नात सर्व काही घाईघाईत केल्याचे सांगितले. आधी परीक्षा होणार आणि त्यानंतर निरोप समारंभ पार पडणार, हे सासूबाईंनी आधीच ठरवून टाकलं होतं.
वर अभिषेक पायसी सांगतात की, आमचे 10 मे रोजी लग्न झाले आणि 11 मे रोजी निरोप घेतला जाणार होता. पत्नी शिवानीची शिक्षक भरतीची परीक्षा 11 मे रोजी होती, त्याआधी आम्ही आणि आमच्या कुटुंबाने शिक्षणाला प्राधान्य दिले. घरातील मुलगी आणि सून या दोघांनाही शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असा आमचा जनतेला संदेश आहे.