सोमवारी संध्याकाळपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसमुळे मुंबईसह अनेक उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
मुंबईत रात्रभर अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.
आज अनेक भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता असून समुद्रास दुपारी 12:47 वाजता भरती येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, भेंडी बाजार जंक्शन, षण्मुखानंद हॉल, गोयल देऊळ, शेख मिस्त्री दरगाह मार्ग इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मुंबईकरांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुंबईतील तब्बल 26 जागांवर पाणी भरले आहे. पाणी भरल्यामुळे बेस्टची बस पाण्यातच थांबवण्यात आली. मुसळधार पावसामुळे बेस्ट बसचा मार्ग बदलण्यात आला आहे.
6 अग्निशमन केंद्रावर पूर बचाव पथक तैनात करण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत. NDRF च्या 3 तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच कोस्ट गार्ड, नेव्ही यांना तत्पर राहण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.