30 नोव्हेंबर, नवी दिल्ली : देशाचा आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांवर पोहोचल्याने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तिमाहीत आर्थिक विकासदरात 5.7 इतकी निचांकी घट झाल्याने केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर चोहोबाजूनी टीका होत होती. पण या तिमाहीत विकास दरात 6.3 इतकी वाढ दिसून आल्याने केंद्र सरकारने नक्कीच मोठा नि:श्वास सोडलाय. या वाढीव विकासदरामुळे अनेक क्षेत्रात तेजी येईल, असा आशावाद केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलाय. अरुण जेटली म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटीचा प्रभाव आता समाप्त झाला असून, सकारात्मक परिणाम दिसतो आहे. ही तेजी येत्या तिमाहीतही कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक विकास दर वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे उत्पादन क्षेत्रात आलेली तेजी आहे. आणि ही वाढ तिस-या आणि चौथ्या तिमाहीतही पाहायला मिळू शकते. परदेशी गुंतवणूकदारांसाठी देशातील परिस्थिती सुधारत चालली आहे. उत्पादन क्षेत्रातही तेजी आली आहे. पुढच्या तिमाहीतही अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी वाढण्याची आशा आहे. मोदी सरकारच्या कठोर निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला आणखी मजबुती आली आहे, असंही जेटली म्हणाले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही आता भाजपकडून या वाढीव विकासदराचं मोठं भांडवलं केलं जाऊ शकतं. कारण नोटबंदी आणि जीएसटी याच दोन मुद्यांवरून काँग्रेसच्या राहुल गांधींनी गुजरात इलेक्शनमध्ये मोदी-शहा जोडगोळीच्या नाकात दम आणला होता.
Demonetisation and GST's impact is behind us and hopefully in coming quarters, we can look for an upwards trajectory: FM Arun Jaitley in Delhi pic.twitter.com/8rnxtCFBIg
— ANI (@ANI) November 30, 2017
Last five quarters had witnessed a downward trend, GDP at 6.3% marks the reversal of that trend: FM Arun Jaitley on GDP growth figures pic.twitter.com/RLyKL4F4tE
— ANI (@ANI) November 30, 2017
The most significant aspect is the fact that this quarter's positive result has been impacted significantly by the growth in manufacturing.: FM Arun Jaitley on GDP growth figures pic.twitter.com/rdrFbsNBnY
— ANI (@ANI) November 30, 2017

)







