02 नोव्हेंबर : देशात सध्या असहिष्णुतेचं वातावरण आहे, असे आरोप असताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लेखकांना आणि विचारवंतांना एक आवाहन केलंय.
लेखकांनी पंतप्रधान मोदींना येऊन भेटावं, जे होतंय त्यासाठी भाजपवर ठपका ठेवणं योग्य नाही. आपले पुरस्कार कृपया परत करू नका, मोदांना येऊन भेटा. केंद्र सरकार यातून नक्की मार्ग काढेल, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं. विचारवंत आणि शास्त्रज्ञांनीही आपल्या सूचना द्याव्यात. त्या नक्की लक्षात घेतल्या जातील, असंही ते म्हणाले.
दादरी प्रकरणी, डॉ.कलबुर्गी हत्येप्रकरणी साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचं सपाटा लावलाय. विशेष म्हणजे, दादरी प्रकरणाचा केंद्र सरकारशी संबंध नाही असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं. त्यांच्यापाठोपाठ भाजपच्या नेत्यांनीही मोदींना जबाबदार धरू नये या अगोदर मुंबई स्फोट झाले तेव्हा पुरस्कार परत का केले नाही असा खडासवाल उपस्थित केला. आज राजनाथ सिंह यांनी थोड नरमाईची भूमिका घेत साहित्यिकांना आवाहन केलं.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







