16 सप्टेंबर
मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येत आहेत. मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव यांनीही कृत्रिम तलाव तयार केला आहे.
पण या कृत्रिम तलावांचा फारसा वापर गणेश भक्त करत नसल्याने या तलावांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेने एक पुढचे पाऊल टाकले आहे.
कृत्रिम तलावांच्या ऐवजी शहरातील तलावांमधील काही भागांमध्ये एक गेबीएन वॉलउभारण्यात आली आहे.
जाहिरात

)







