08 जुलै : रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा रेल्वे अर्थसंकल्प मांडणार आहेत. सोमवारी रेल्वेमंत्र्यांनी बजेटवरुन अखेरचा हात फिरवला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पदरात काय पडणार आहे याकडे उभ्या देशाचं लक्ष लागलंय. रेल्वेमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत ? - रेल्वेला सध्या 26,000 कोटी रुपयांची गरज आहे. हे पाहता फार मोठ्या घोषणा करणार नाहीत - लोकांना खूश करणारे निर्णय न घेता, रेल्वेचा कारभार सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न - इंधनासाठीचा वाढता खर्च पाहता सौर ऊर्जा आणि बायो डिझेलच्या वापरासाठी प्रयत्न किंवा प्लांटसाठी तरतूद - वर्ल्ड बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी, एशियन डेव्हलपमेंट बँककडून भांडवल मिळवण्याचा प्रयत्न - पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा - थेट परकीय गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात आणण्यासाठी FDI पॉलिसी जाहीर करण्यात येण्याची शक्यता - सुरक्षित आणि वेगवान प्रवास आणि प्रवाशांचं संरक्षण यावर भर +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







