कोलकात्ता, 26 मे: यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसासह आणि वादळी वारे वाहत आहेत. या पमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या चक्रीवादळामुळे जवळपास एक कोटी लोकं प्रभावित झाले असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (WB CM Mamata Banerjee) यांनी दिली आहे. तसंच 15 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. या चक्रीवादळात पश्चिम बंगालमधील तीन लाख घरांचं नुकसान झालं आहे. या चक्रीवादळात नुकसानग्रस्त मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा भागांचा दौरा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगतिलं. चक्रीवादळात बाधित झालेल्या भागासाठी आम्ही एक कोटी रुपयांची मदत पाठविली असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी यास चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
#WATCH | Jharkhand: Ranchi experiences a change in weather in wake of #CycloneYaas.
— ANI (@ANI) May 26, 2021
As per IMD, the state will receive heavy to very heavy rainfall today & tomorrow with extremely heavy rainfall in isolated places. pic.twitter.com/Cm9g4v4wdg
सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज आहे.
Boats and shops damaged after landfall of #CycloneYaas in Odisha. Check posts barricades blown away with the wind at Udaipur near the West Bengal-Odisha border. pic.twitter.com/lRQqHOMqSY
— ANI (@ANI) May 26, 2021
ओडिशात यास चक्रीवादळामुळे भद्रक जिल्ह्यातील धामरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून धामरा जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. वादळामुळे कोसळलेली झाड हटवण्याचं काम देखील सुरु करण्यात आलं आहे.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee holds review meeting with District Magistrates, Disaster Management Committee, and other officials in view of #CycloneYaas, in Nabanna pic.twitter.com/BqM3DzWVg7
— ANI (@ANI) May 26, 2021
यास चक्रीवादळामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागनं वर्तवला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.