उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणानुसार एका कालावधीनंतर राज्यातील एकूण प्रजनन दर (TFR) 1.7 करण्याचे उद्दीष्ट आहे. विश्व हिंदू परिषदेनं याचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. योगी सरकारचे दोन मुल धोरण (Two Child Policy) चांगली आहे. मात्र प्रजनन दर दोन पेक्षा कमी करणे योग्य नाही. यामुळे अनेक नकारात्मक समाजिक आणि आर्थिक परिणाम होतील, असा दावा विश्व हिंदू परिषदेनं केला आहे. VIDEO: लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्यांचा हात; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान चीनचे दिले उदाहरण एक मुल धोरणामुळे राज्यात भविष्यात अशी परिस्थिती येईल की, त्यामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीलाच आपले वृद्ध आई-वडिल, आजी-आजोबांसह चार व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. चीनने देखील तीन दशकांनतर या धोरणामध्ये बदल केला आहे. त्याचबोबर एक मुल असल्यास त्याचे पालकांकडून अतिरिक्त लाड होतात. ज्याला “Little Emperor” syndrome असे म्हटंले जाते. यामुळे मुलांना आपले भाऊ-बहिण किंवा अन्य कोणत्या व्यक्तीशी काही शेअर करण्याची सवय राहत नाही, असा आक्षेपही विश्व हिंदू परिषदेनं नोंदवला आहे.VHP suggests UP Law commission to delet one child norm from the draft population policy.. pic.twitter.com/YRcd9XsenS
— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) July 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Uttar pradesh, VHP, Yogi Aadityanath