पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. असा रचला होता कट दहशतवाद्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची चोरी केली होती. मोठा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी दगडांच्या ढिगाऱ्यामधून सुमारे 500 जिलेटिन कांड्या चोरी केल्या होत्या. यासह त्यांनी जवळच्या दुकानातून अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम पावडर कमी प्रमाणात विकत घेतली होती, जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. इतकंच नाही तर, आरडीएक्स पाकिस्तानकडून बऱ्याच वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात मागवलं गेलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या फॉरेन्सिक तज्ञांनी हल्ल्यात अमोनियम नायट्रेट, नायट्रोग्लिसरीन आणि आरडीएक्सचा वापर केल्याची पुष्टी आधीच केली होती. गृह मंत्रालयाच्या (एमएचए) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने हल्ल्यानंतर लगेचच सर्व पुरावे एकत्र केले होते. हे स्फोटक साहित्य कसं गोळा केलं आणि यामागे कोण होतं याची माहिती मिळाली. ते म्हणाले की, आरडीएक्स पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आलं होतं. तर या हल्ल्यासाठी जैशचे दहशतवादी गुप्तपणे भारतात घुसले होते.Jammu: National Investigation Agency (NIA) team reaches NIA court to file a chargesheet in 2019 Pulwama terror attack case in which 40 CRPF personnel were killed pic.twitter.com/8nyfYoDGsz
— ANI (@ANI) August 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pulwama aatack