जाहिरात
मराठी बातम्या / देश / नेताजींची मुलगी अनिता बोस यांची खास मागणी; म्हणाल्या DNA चाचणी करा अन्..

नेताजींची मुलगी अनिता बोस यांची खास मागणी; म्हणाल्या DNA चाचणी करा अन्..

नेताजींची मुलगी अनिता बोस यांची खास मागणी; म्हणाल्या DNA चाचणी करा अन्..

Netaji Subhas Chandra Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : भारत स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीने सरकारकडे खास मागणी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस फाफ म्हणाल्या की त्यांच्या वडिलांचे अवशेष भारतात आणण्याची वेळ आली आहे. यासोबतच त्या म्हणाले की, 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींच्या मृत्यूबाबत ज्यांना अजूनही शंका आहे, त्यांची उत्तरे ‘डीएनए’ चाचणीतून मिळू शकतात. ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला फाफ आता जर्मनीत राहत आहेत. टोकियोतील रेन्कोजी मंदिरात ठेवलेले अवशेष नेताजींचेच असल्याचा वैज्ञानिक पुरावा ‘डीएनए’ चाचणीतून मिळू शकेल आणि जपान सरकारने याबाबत संमती दिली आहे, असे त्या म्हणाल्या. नेताजींचा एकुलती एक मुलगी फाफ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे वडील स्वातंत्र्याचा आनंद अनुभवण्या मुकले. पण, किमान त्यांचे अवशेष भारतीय भूमीत परत आणण्याची वेळ आली आहे. त्या म्हणाल्या, “आधुनिक तंत्रज्ञानाने आता डीएनए चाचणी केली जाते, अट फक्त डीएनए त्यांच्या अवशेषांमधून घेतलेला असावा. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींच्या मृत्यूबद्दल ज्यांना अजूनही शंका आहे, त्यांना टोकियोच्या रेन्कोजी मंदिरातील अवशेष त्यांचेच असल्याचे वैज्ञानिक पुरावे मिळू शकतात. फाफ यांनी सांगितले, की “नेताजींच्या मृत्यूच्या अंतिम अधिकृत भारतीय चौकशीच्या संलग्न कागदपत्रांनुसार (न्यायमूर्ती मुखर्जी चौकशी आयोग), रेन्कोजी मंदिराचे पुजारी आणि जपानी सरकारने अशा चौकशीसाठी हिरवा कंदील दिला दर्शवला आहे,” त्यामुळे त्यांना घरी आणण्याची योग्य वेळ आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा नेताजींच्या आयुष्यात काहीही महत्त्वाचे नव्हते. परकीय राजवटीपासून मुक्त झालेल्या भारतात राहण्याशिवाय त्यांची कोणतीही मोठी इच्छा नव्हती. आता वेळ आली आहे की किमान त्यांचे अवशेष भारतीय भूमीत परत येऊ शकतील. 12 तासांच्या चकमकीत 36 माओवाद्यांना कंठस्नान, गडचिरोली पोलीस दलाचा देशाला अभिमान, तिघांना शौर्यचक्र नेताजींच्या मृत्यूचे गूढ कायम विशेष म्हणजे नेताजींच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैपेई येथे झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे दोन चौकशी आयोगाने म्हटले आहे, तर तिसऱ्या चौकशी आयोगाने बोस अजूनही जिवंत असल्याचे म्हटले होते. फाफ म्हणाल्या, “नेताजींचे एकुलते एक अपत्य असल्याच्या नात्याने स्वतंत्र भारतात परतण्याची त्यांची इच्छा किमान या स्वरूपात पूर्ण होईल आणि त्यांच्या सन्मानार्थ योग्य समारंभ आयोजित केले जातील याची खात्री करणे हे माझे कर्तव्य आहे.” भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख ‘नायकां’पैकी एक असलेले बोस अद्याप आपल्या मायदेशी परतलेले नाहीत. फाफ अशाही म्हणाल्या की, “आता स्वातंत्र्यात जगू शकणारे सर्व भारतीय, पाकिस्तानी आणि बांग्लादेशी हे सर्व नेताजींचे कुटुंब आहेत.” माझे बंधू आणि भगिनी या नात्याने मी तुम्हाला सलाम करते आणि नेताजींना मायदेशी आणण्याच्या तुमच्या प्रयत्नांना साथ द्यावी अशी मी विनंती करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात