मराठी बातम्या /बातम्या /देश /Mission Paani : भारतातील ही चिमुकली पर्यावरण कार्यकर्ती सांगतेय ते ऐका - 'ही आणीबाणीची वेळ आहे'

Mission Paani : भारतातील ही चिमुकली पर्यावरण कार्यकर्ती सांगतेय ते ऐका - 'ही आणीबाणीची वेळ आहे'

Mission Paani Waterthon: वातावरणबदलाची समस्या गंभीर रूप धारण करते आहे. वेळीच तिचं गांभीर्य ओळखावं यासाठी भारतातील एक चिमुरडी (Licypriya Kangujam) प्रयत्नशील आहे.

Mission Paani Waterthon: वातावरणबदलाची समस्या गंभीर रूप धारण करते आहे. वेळीच तिचं गांभीर्य ओळखावं यासाठी भारतातील एक चिमुरडी (Licypriya Kangujam) प्रयत्नशील आहे.

Mission Paani Waterthon: वातावरणबदलाची समस्या गंभीर रूप धारण करते आहे. वेळीच तिचं गांभीर्य ओळखावं यासाठी भारतातील एक चिमुरडी (Licypriya Kangujam) प्रयत्नशील आहे.

नवी दिल्ली, 26 जानेवारी : वातावरणबदलाची (climate change) समस्या पृथ्वीसाठी अतिशय गंभीर आहे. मात्र अनेकांना ती खरी समस्या आहे हेच पटत नाही. आपली आजची जीवनशैली, विविध बेजबाबदार कृती यातून वातावरणबदलाची समस्याच अजूनच तीव्र होते आहे. याबाबत जनजागृती करणं हे केवळ अनुभवी, वयोवृद्ध शास्त्रज्ञांचं काम नाही तर उद्याचं भविष्य जिच्या हाती आहे ती तरुण पिढीसुद्धा याबाबत बोलते आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे लिसिप्रिया कंगुजम (Licypriya Kangujam).

जगभरात आपल्या धडाडीमुळं लक्षवेधी ठरलेली ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र लिसिप्रियाचं योगदान जगातच नाही तर भारतातही दुर्लक्षितच राहिलं. 2019 मध्ये स्पेनच्या माद्रिद इथं झालेल्या युनायटेड नेशन्स क्लायमेट कॉन्फरन्समध्ये (United nations climate conferance) बोलण्यासाठी तिची निवड केली गेली. त्यावेळी ती माध्यमांमध्ये झळकली. त्यावेळी तिचं वय होतं केवळ 8 वर्ष. या वयात तिनं ऐतिहासिक भाषण (speech) दिलं आणि पृथ्वीला वाचवण्याची शपथही त्या भाषणातून दिली.

लिसिप्रिया गेली 2 वर्षे एक मोहीम चालवते आहे. पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवणं आणि वातावरणबदलाबाबत साक्षरता वाढवण्यासाठी शाळेतील अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करणं यासाठी ही मोहीम आहे. भाषणातही तिनं मुद्दे मांडले, की आता अतिशय आणीबाणीची वेळ आहे. आपण वातावरणबदलाबाबत आता जागे झालो नाही तर मोठ्या संकटात अडकू. तिनं हा प्रश्नसुद्धा विचारला, की वातावरणबदलाची समस्या तर तिच्या जन्मापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मग तज्ज्ञांनी आजवर या समस्येकडे लक्ष देत तिला का सोडवलं नाही? तिनं आज या परिषदेत येण्याऐवजी खेळण्यात किंवा शाळेत जाण्यात तिचा वेळ घालवायला पाहिजे होता, असंही ती स्पष्टपणे म्हणाली.

याशिवाय लिसिप्रिया हातात फलक घेऊन अनेक आठवडे देशातील संसदेबाहेरसुद्धा (parliament) हातात फलक घेऊन उभी राहिली. देशात वातावरणबदलाचे कायदे केले जावेत आणि कार्बन उत्सर्जनाचं नियमन केलं जावं हे तिला अपेक्षित होतं. मात्र तिच्या हाती निराशा आली. शासन मतं आणि आर्थिक बाबींमध्येच जास्त रस घेत असल्याचं निरीक्षण तिनं नोंदवलं.

तिला मोठं होऊन अवकाशतज्ञ बनायचं आहे. युनायटेड नेशन्सच्या परिषदेत सहभाग घेण्यासाठी जाताना तिनं शासनाकडं सतत निधीची मागणी केली. मात्र तिनं सतत विनंती करूनही शासनानं प्रतिसाद दिला नाही.

First published:
top videos

    Tags: Environment, Greta Thunberg, Mission paani