मराठी बातम्या /बातम्या /देश /फक्त 10 रुपयात मिळणार LED बल्ब; जाणून घ्या केंद्र सरकारची Gram Ujala Yojana आहे काय?

फक्त 10 रुपयात मिळणार LED बल्ब; जाणून घ्या केंद्र सरकारची Gram Ujala Yojana आहे काय?

सीईएसएलने या वर्षी मार्चमध्ये खेड्यापाड्यात 10 रुपयांच्या किमतीत एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी योजना सुरू केली होती. या महिन्यात, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, 2021 च्या निमित्ताने, CESL ने एकाच दिवसात 10 लाख एलईडी बल्ब वितरित करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य गाठले.

सीईएसएलने या वर्षी मार्चमध्ये खेड्यापाड्यात 10 रुपयांच्या किमतीत एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी योजना सुरू केली होती. या महिन्यात, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, 2021 च्या निमित्ताने, CESL ने एकाच दिवसात 10 लाख एलईडी बल्ब वितरित करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य गाठले.

सीईएसएलने या वर्षी मार्चमध्ये खेड्यापाड्यात 10 रुपयांच्या किमतीत एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी योजना सुरू केली होती. या महिन्यात, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, 2021 च्या निमित्ताने, CESL ने एकाच दिवसात 10 लाख एलईडी बल्ब वितरित करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य गाठले.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : केंद्र सरकार ग्राम उजाला योजनेंतर्गत केवळ 10 रुपयांमध्ये एलईडी बल्ब देत आहे. आतापर्यंत 50 लाखांहून अधिक एलईडी बल्बचे वाटप करण्यात आलं आहे. सरकारी कंपनी कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात CESL कडून ग्राम उजाला योजनेंतर्गत 50 लाख एलईडी बल्ब वितरीत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी (Gram Ujala Yojana) केली आहे.

योजना ग्रामीण भागात

सीईएसएलने या वर्षी मार्चमध्ये खेड्यापाड्यात 10 रुपयांच्या किमतीत एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी योजना सुरू केली होती. या महिन्यात, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, 2021 च्या निमित्ताने, CESL ने एकाच दिवसात 10 लाख एलईडी बल्ब वितरित करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य गाठले.

ग्राम उजाला योजना काय आहे

CESL पारंपरिक बल्बच्या बदल्यात 3 वर्षांच्या हमीसह उच्च दर्जाचे 7W आणि 12W LED बल्ब प्रदान करत आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 5 बल्ब मिळू शकतात.

हे वाचा - तुमचंही मूल जास्त चंचल आहे का? काळजी करू नका, त्याचा हा गुण भविष्यात ठरेल फायदेशीर

वर्षाला 250 कोटीची बचत

ग्रामीण भागात प्रतिवर्षी 71 कोटी युनिटपेक्षा जास्त विजेची बचत होईल, असा अंदाज आहे. यामुळे खर्चाच्या स्वरूपात वार्षिक सुमारे 250 कोटी रुपयांची बचत होईल. हा कार्यक्रम 31 मार्च 2022 पर्यंत चालेल.

CESL कंपनीचे सीईओ महुआ आचार्य म्हणाले की, “ग्रामीण पर्यावरणाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे. कार्बन क्रेडिटच्या आर्थिक मॉडेलवर काम करत आहे. अपेक्षित लक्ष्य पूर्ण झाल्यावर आम्ही हा कार्यक्रम इतर राज्यांतील गावांमध्ये विस्तारित करू."

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

ऊर्जा मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) ची उपकंपनी असलेल्या CESL ने ही कामगिरी केली आहे. ग्राम उजाला योजना सध्या बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील ग्रामीण भागांमध्ये राबविण्यात येत आहे.

First published:

Tags: Central government, Scheme