नवी दिल्ली, 26 जानेवारी : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. रॅलीदरम्यान शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडल्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आंदोलन करत आहेत, त्यावेळी संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर भागात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
Police use tear gas to disperse farmers at Sanjay Gandhi Transport Nagar
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) January 26, 2021
Farmers tractor rally from Singhu border arrived here.#Delhi #FarmersProtest
📷: ANI pic.twitter.com/DE8RAn7BBg
Farmers carry out #tractorparade at Ghazipur border amid high security deployment.
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) January 26, 2021
They are following the Ghazipur border-Apsra border-Hapur Road-IMS College-Lal Kuan-Ghazipur border route#Delhi #farmersrprotest pic.twitter.com/BMXxBFigDW
सिंघू बॉर्डरवरून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या भागात आले होते. दुसरीकडे दिल्लीच्या स्वरूप नगरमध्ये शेतकऱ्यांवर फुलं उधळण्यात आली. गाझीपूर बॉर्डरवरून अप्सरा बॉर्डर-हापूर रोड-आयएमएस कॉलेज-लाल कौन-गाझीपूर मार्गे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघाली.