जाहिरात
मराठी बातम्या / देश / सरकारच्या उलट आहे शास्त्रज्ञांचा दावा, कोरोनाचं होतंय कम्युनिटी ट्रान्समिशन

सरकारच्या उलट आहे शास्त्रज्ञांचा दावा, कोरोनाचं होतंय कम्युनिटी ट्रान्समिशन

या माहितीने जगभरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

या माहितीने जगभरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

देशात कोव्हिड-19 संसर्गाचे कम्युनिटी ट्रान्समिशन होत आहे. या आरोग्य तज्ञांमध्ये एम्सचे डॉक्टर, आयसीएमआर रिसर्च ग्रुपचे दोन सदस्य इत्यादींचा समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जून : कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमध्ये, काही आरोग्य तज्ञांनी असा दावा केला आहे की, देशात कोव्हिड-19 संसर्गाचे कम्युनिटी ट्रान्समिशन होत आहे. या आरोग्य तज्ञांमध्ये एम्सचे डॉक्टर, आयसीएमआर रिसर्च ग्रुपचे दोन सदस्य इत्यादींचा समावेश आहे. सोमवारी सकाळी देशात कोरोना रूग्णांची संख्या 1,90,535 वर पोहोचली तर आतापर्यंत 5394 मृत्यू झाले आहेत. असं असूनही, सरकार कोरोना विषाणूचं भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन होत नसल्याचं सातत्याने सांगत आहे. भारत आता कोरोना विषाणूमुळे ग्रस्त जगातील सातवा क्रमांकाचा देश बनला आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (IPHA), इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (IAPSM) आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडिमियोलॉजिस्ट (IAE) च्या तज्ञांनी तयार केलेला अहवाल पंतप्रधानांना सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रीवादळ, हवामान खात्याने फोटो केला प्रसिद्ध अहवालात असं म्हटलं आहे की, या रोगाचा कम्युनिटी ट्रान्समिशन होत असल्याने या टप्प्यावर कोरोना विषाणूची महामारी दूर होऊ शकेल अशी अपेक्षा करणं योग्य नाही. अहवालानुसार, कोरोना रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अपेक्षित फायदा असा होती की, हा रोग काही काळापर्यंत पसरण्यापासून रोखता आला, तोपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. 16 सदस्यांच्या जॉइंटकोव्हिड-19 टास्क फोर्समध्ये आयएपीएसएमचे माजी अध्यक्ष डॉ. शशी कांत, आयपीएचएचे अध्यक्ष डॉ. संजय के. राय, बीएचयूचे डीसीएस रेड्डी आणि पीजीआयएमईआर, चंदीगडचे डॉ. डॉ. रेड्डी आणि डॉ. कांत कोरोना साथीच्या शोधात आयसीएमआरचे सदस्य आहेत. तुमच्यासोबत या परीक्षेत पास झालो असं समजू का? उच्चशिक्षण मंत्र्याचं भावनिक पत्र अहवालातील तज्ज्ञांनी असंही म्हटलं आहे की, साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी निर्णय घेताना महामारीशास्त्रज्ञांचा सल्ला घेतला गेला नाही. मानवतावादी संकट आणि रोगाचा प्रादुर्भाव या दोन्ही बाबतीत भारत मोठी किंमत मोजत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रावर आणखी एक संकट, या राज्यांना 3 जूनपर्यंत दिला सतर्कतेचा इशारा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात