अहमदाबाद, 21 जानेवारी : मुंबईत राहणारा अर्जुन अहमदाबाद येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. तो नदीच्या पुलावरील रेल्वे ट्रॅकवरुन घरी चालत जात होता. आपल्य़ा नातेवाईकांची फार दिवसांनी भेट होणार असल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र त्याच्या नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक पार करुन जावं लागत होतं. म्हणून तो झपाझप पावलं टाकत होता. सुर्य मावळतीला आला असल्याने लवकरात लवकर घरी पोहोचणं गरजेचं होतं. त्यावेळी अचानक त्याला मागून रेल्वे येत असल्याचे लक्षात आलं. रेल्वेचा हाॅर्न वाजत होता. तो क्षणभर घाबरला आणि भरभर चालू लागला. मात्र त्याचवेळी पाय घसरल्याने तो थेट नदीत पडला. पडल्यानंतर त्याला काय करावे कळेना. तो काही वेळ गटांगळ्या खात राहिला. सायंकाळ झाली होती. आजूबाजूला फार कोणी दिसत नव्हत. त्याने आरडाओरडा केला.
रेल्वे ट्रॅकवरुन चालणारा हा युवक पाय घसरुन नदीत पडला आणि रात्रभर तेथेच राहिला... pic.twitter.com/jAvVZr795O
— News18Lokmat (@News18lokmat) January 21, 2020
लांब लांबपर्यंत कोणीच नसल्याने कोणीच त्याच्या मदतीसाठी आले नाही. नंतर त्याच्याकडे मोबाइल असल्याचे लक्षाच आले. मात्र पाण्यात भिजल्याने त्याचा मोबाइलही काम करीत नव्हता. जिथे तो पडला होता, त्याच्या जवळपास लोखंडाचे जुने स्टक्चर त्याला दिसले. तो कसाबसा त्या स्ट्रक्चरवर चढला आणि तेथेच बसून राहिला. काळा कुट्ट अंधार झाला होता. राजकिड्यांचा आवाजामुळे घाबरायलाच होत होते. संपूर्ण रात्र तो त्या लोखंडाच्या स्टक्चरवर बसून रहिला. पाण्यात पडल्याने त्याचे संपूर्ण कपडे ओले जात होते. शिवाय त्याला नीट पोहताही येत नसल्याने जागा मिळेल तिथेच बसून राहण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय नव्हता. तो रात्रभर नदीच्या मधोमध बसून राहिला. शेवटी सकाळी रिवर फ्रंटवर गार्डला बसून आवाज दिला. त्यानंतर गार्डने रेस्क्यू टीमला कळवले आणि त्यांनी तरुणाचा जीव वाचवला.