मराठी बातम्या /बातम्या /देश /लग्नाच्या दिवशी वरातीची वाट पाहत होती वधू, एक मेसेज आला अन् सरकली पायाखालची जमीन

लग्नाच्या दिवशी वरातीची वाट पाहत होती वधू, एक मेसेज आला अन् सरकली पायाखालची जमीन

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

एक मनाला चटका लावणारी बातमी समोर येतेय. नववधू हाताला मेंदी लावून वराची वाट पाहत होती. महिला लग्नाची गाणी गात होत्या. वधू पक्षाचे (Bride's party) लोक वरातीच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त होते.

बिहार, 28 डिसेंबर: एक मनाला चटका लावणारी बातमी समोर येतेय. नववधू हाताला मेंदी लावून वराची वाट पाहत होती. महिला लग्नाची गाणी गात होत्या. वधू पक्षाचे (Bride's party) लोक वरातीच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त होते. सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. लग्नाचा मंडप तयार होता. भटजी लग्नाच्या (wedding) तयारीत व्यस्त होते. त्याचवेळी वराच्या बाजूने आलेल्या एका मेसेजनं वधूच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणाचे दु:खात रूपांतर झाले. गाणं गाणाऱ्या महिला एकदम शांत झाल्या. घरातील सदस्य गोंधळून गेले आणि भटजीही स्तब्ध झाले. वराच्या पक्षानं मेसेज करून सांगितले की, हुंड्यात दिलेले 2 लाख रुपये कमी आहेत. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही.

ही घटना बिहारची राजधानी पाटण्यातील आहे. या धक्कादायक घटनेत वराच्या बाजूच्या लोकांनी दोन लाख रुपये हुंडा कमी दिल्याचं कारण देत लग्न मोडल्याची चर्चा आहे. लग्न मोडल्यानंतर सोमवारी पीडित मुलीच्या वतीने महिला पोलीस ठाण्यात निवेदन देऊन न्याय मागितला आहे. हुंडाबळी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कायदेशीर कारवाई करणं गरजेचं असल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. सध्या महिला पोलीस त्या वराच्या पक्षाला पोलीस ठाण्यात बोलावतील, जेणेकरून दुसरी बाजू जाणून घेऊन प्रकरणाचा तपास पुढे नेता येईल.

नववधू झालेल्या मुलीनं गाठलं पोलीस स्टेशन

पीडितेनं फिर्यादीत म्हटलं आहे की, लग्नाच्या दिवशीच वराच्या घरच्यांनी निरोप पाठवून दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नसल्याचं सांगितलं. वधू पक्षाच्या लोकांनी सांगितलं की, वराला हुंड्यात 3.50 लाख रोकड, एक अंगठी आणि 10 हजार रुपयांचे कपडे यासह लग्नातल्या खर्चासाठी 1.65 लाख रुपये दिले होते. पीडितेने सांगितलं की, लग्नाची सर्व तयारी तिच्या कुटुंबीयांनी पूर्ण केली होती. साखरपुड्यापासून तिळकांपर्यंतचे विधी पूर्ण झाले होते. इतकं सगळं असूनही 13 डिसेंबरला लग्नाच्या दिवशी वर मंडळी वरात घेऊन आली नाही.

अन्य लोकांतर्फे आला मेसेज - हुंड्यात 2 लाख रुपये कमी

वधूनं सांगितले की, मुलाच्या बाजूने बाहेरील लोकांमार्फत मेसेज केला. यामध्ये दोन लाखांपेक्षा कमी हुंड्यामुळे लग्न न झाल्याची चर्चा होती. लग्नाआधी बुकिंग आणि सर्व प्रकारचा कार्यक्रम मुलाच्या संमतीने केल्याचंही पीडितेने सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार समाजसुधारणा अभियानांतर्गत अंमली पदार्थ निर्मूलन, बालविवाह बंदी आणि हुंडा निर्मूलन या तीन प्रमुख मुद्द्यांचा संदेश जनतेमध्ये असताना बिहारमध्ये ही परिस्थिती आहे.

First published:

Tags: Bihar