पाटणा 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर NDAला बहुमत मिळालं असा दाव भाजपने केला आहे. रात्री 11.15 वाजता भाजपने पत्रकार परिषद घेऊन बहुमताचा दावा केलाय. रात्री उशीरा हाती आलेल्या माहितीनुसार NDAने बहुमतासाठी 123 जागा जिंकल्या होत्या. तर आणखी 2 जागावर NDAला आघाडी आहे. तर महाआघाडीची गाडी 110वर थांबला आहे. नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केलाय. आरजेडीने खुल्या मनाना पराभव स्वीकारावा असं आवाहनही भाजपने केलं आहे. सुशील कुमार मोदी यांनी आणि सर्व नेत्यांनी आपल्या यशाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. निवडणूक आयोगाने मात्र अनेक जागांची औपचरिक घोषणा रात्री उशीरापर्यंत केलेली नव्हती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या विजयाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहे. जनतेने खोट्या आश्वासनांना नाकारलं असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
बिहार के हर वर्ग ने फिर एक बार खोखलेवादे, जातिवाद और तुष्टिकरण की राजनीति को सिरे से नकार कर NDA के विकासवाद का परचम लहराया है।
— Amit Shah (@AmitShah) November 10, 2020
यह हर बिहारवासी की आशाओं और आकांक्षाओं की जीत है...@narendramodi जी और @nitishkumar जी के डबल इंजन विकास की जीत है।@BJP4Bihar के कार्यकर्ताओं को बधाई।
दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही यशाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना दिलं आहे.
मैं बिहार की जनता को आज के जनादेश के लिए हार्दिक बधाई देता हूँ और आभार व्यक्त करता हूँ।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) November 10, 2020
बिहार की जनता ने प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की लोक-कल्याणकारी नीतियों, विकास कार्यों के परफॉरमेंस और श्री नितीश कुमार के नेतृत्व में एनडीए सरकार के कार्यों पर अपनी मुहर लगाई है। pic.twitter.com/jdj2ItgEZU
खासदार असदुद्दीन ओवैसी याचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) हा ‘वोट कटवा’ आहे, अशा शब्दांत अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली आहे. एवढंच नाही तर AIMIM ही भाजपचा (BJP) मित्र पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सर्व सेक्युलर पक्षांनी ‘वोट कटवा’ ओवैसी यांच्यापासून सावध राहायला हवं, असं देखील अधीर रंजन चौधरी यांनी सल्ला दिला आहे. बिहार निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचा भाजपनं स्वत: च्या स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे, अशी टीका देखील अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.