जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ठाणेकरांनो उद्या पाणी साठवून ठेवा; पुढील काही दिवस पाणी कपात

ठाणेकरांनो उद्या पाणी साठवून ठेवा; पुढील काही दिवस पाणी कपात

ठाणेकरांनो उद्या पाणी साठवून ठेवा; पुढील काही दिवस पाणी कपात

पुढील १ ते २ दिवस काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 22 ऑगस्ट : ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला वेळोवेळी पूर आला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा जमा झालेला आहे. पाण्यासोबत आलेला गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झाला आहे. तसेच इंदिरानगर संप येथे पाण्याची गळती झाल्याने येथील गळती काढणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने बुधवारी, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९  ते रात्री ९ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदिरानगर पंप हाऊसवरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर Eor भागात पाणी पुरवठा बंद राहील, तसेच उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात