मुंबईला यापूर्वी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र हवामानाची बदलती परिस्थिती पाहून हवामान खात्याने आता रेड अलर्ट जारी केला आहे.
गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
समुद्राच्या किनाऱ्यावरून जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून त्यामुळे किनारी भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी पर्यटकांनी जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला आहे.
मुंबई लोकल सामान्यांसाठी बंद असल्यामुळे अगोदरच रस्त्यावर गर्दी होते. त्यात पावसामुळे जागोजागी पाणी साचून वाहतूक कोंडीची शक्यता आहे.
पुढले दोन ते दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.