मुंबई, 26 मे : मुंबईकरांनो आता सावध राहा. कारण कोरोनाव्हायरस पुन्हा मुंबईला आपल्या विळख्यात घेतो आहे (Coronavirus cases increasing in Mumbai). मुंबईत पुन्हा दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे (Coronavirus in Mumbai). आज तर सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तीन महिन्यांनंतर दैनंदिन कोरोना रुग्णांचा पुन्हा हादरवणारा आकडा समोर आला आहे (Highest daily corona cases in Mumbai). मुंबईत आज एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार आज गुरुवारी शहरात 350 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 11 फेब्रुवारीला 350 पेक्षा अधिक म्हणजे 367 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एकाच दिवसात आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. शहरात 23 मे रोजी 150, 24 मे रोजी 218, 25 मे रोजी 295 नवे रुग्ण आणि 26 मे रोजी 350 नवे रुग्ण आहेत. याचा अर्थ दरदिवशी हा आकडा 50 ने वाढतो आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सलग 10 दिवसात शहरात 150 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण दिसून येत आहेत. ही नक्कीच काळजीची बाब आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 26, 2022
26th May, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/AqqsBBfadh
दैनंदिन रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मुंबईत पुन्हा एकदा निर्बंध (restriction in Mumbai) लावण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती दिली आहे. हे वाचा - मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत कोविड रुग्णसंख्या वाढते आहे याबाबत आढावा घेऊन चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, आज कॅबिनेटमध्ये जे मुद्दे होते त्या सर्वांवर चर्चा झाली. कोविडचे रुग्ण वाढले त्यावर चर्चा झाली. संख्या वाढली तर येत्या काळात निर्बध येण्याची शक्यता आहे. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंधांची वेळ येईल. दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले आहे. पुन्हा मास्क सक्ती होणार? गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. मास्क मुक्ती झाल्याने नागरिकांनी सुद्धा मोकळा श्वास घेतला. पण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात केंद्राचं पाच राज्यांना पत्र भारतातील काही भागांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पाच राज्यांना पत्र लिहून अलर्ट दिला होता. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं होतं. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.

)







