काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (17 जानेवारी) कर्नाटक– महाराष्ट्र सीमा लढ्यात आपल्या प्राणाचं बलिदान देण्याऱ्या लोकांना हुतात्मा दिनी अभिवादन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..!It's unfortunate, I condemn the statement. We're not going to give even an inch of land from this side: Karnataka CM on Maharashtra CM's statement that his govt is committed towards incorporating into the state, the areas of Karnataka where Marathi-speaking people are in majority pic.twitter.com/vV48M6Xcin
— ANI (@ANI) January 18, 2021
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे, हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह उद्धव ठाकरे यांनी हूतात्म्यांना विनम्र अभिवादन केलं होतं. आता उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आणि बी एस येडियुरप्पा यांनी दिलेली प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन!
सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा! — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Maharashtra, Uddhav thackarey, Yediyurppa