मुंबई, 13 सप्टेंबर: बंगालच्या उपसगारात (bay of bengal) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे. आता ते आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy rainFall) पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असणार आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच घाट भागातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Latest satellite obs at 6 am 13 Sept
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 13, 2021
Multi layered dense cloud patch observed over S Gujarat, isolated patches over N Konkan and N Mah, scattered type over Vidarbha with mod intensity.
Watch for IMD updates.
Mumbai Thane light to mod rains in last 6 hrs. pic.twitter.com/oDkPxrkVHQ
येत्या तीन ते चार दिवसांत या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही पुढील काही तासांत पाऊस झोडपणार आहे.
Thane and around, intense convection clouds observed with intensity around 40 dBz right now.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 12, 2021
Lighting and thunder reported with intense spell of rains going on now for last 20 min.
Eastern suburbs close to Thane could also see the impact.
Latest IMD radar obs posted here pl. pic.twitter.com/4KKb7W7B9K
आजपासून बुधवारपर्यंत अतिमुसळधार पाऊस भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी म्हणजेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 15 सप्टेंबरला पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 16 सप्टेंबरला मात्र पावसाचा जोर काहीशा प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.