मुंबई, 03 जून: मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी राज्यातील अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भातली मोठी घोषणा केली आहे. पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे. तिथं पूर्णपणे लॉकडाऊन हटवण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राज्य अनलॉक करण्यासाठी सरकारनं पाच टप्पे ठरवले आहेत. तसंच ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे आहेत. या जिल्ह्यातमध्ये पूर्णतः लॉकडाऊन उठवण्यात आलं आहे. जाणून घ्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पूर्णतः लॉकडाऊन उठवलं आहे.
अनलॉक झालेल्या जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे
राज्य सरकारनं या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवले आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू राहणार असल्याचीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाणार असल्यांचही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा- Maharashtra Unlock: राज्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यास 100 टक्के सूट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.