मुंबई, 23 जून : लडाखमधील भारत-चीन चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. यामध्ये चीनचेही अनेक सैनिक मारले गेले आहेत. यादरम्यान चीनच्या कुरापती सुरूच असल्याचं दिसून येत आहे. या चकमकीनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील पायाभूत सुविधा, बँकिंग आणि माहिती क्षेत्रातील सायबर स्पेसमध्ये चीनकडून सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 4-5 दिवसांत चीनकडून 40300 सायबर हल्ले करण्यात आले आहेत, अशी माहिती यशस्वी यादव, विशेष आयजी सायबर विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र साइबर विभाग "चीनी साइबर हमलावर बड़े पैमाने पर फ़िशिंग हमले की योजना बना रहे हैं" के बारे में वार्निंग एडवाइज़री जारी की। https://t.co/xqsSpEUf3o pic.twitter.com/A9MUrTpXkZ
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2020
महाराष्ट्र सायबर विभाग चिनी सायबर हल्ल्यांविरोधात मोठ्या प्रमाणात फिशिंग हल्ल्याची योजना तयार करीत आहे. याबाबत महाराष्ट्र सायबर विभागाने नियमावली जारी केली आहे.
काय आहेत नियम -
हे वाचा-पाकिस्तानातील धक्कादायक प्रकार; शीख मुलीचं अपहरण करुन केलं धर्मांतर, आणि...
-सोशल मीडियावरुन आलेल्या संदेशातील लिंक खात्री केल्याशिवाय ओपन करू नये
-कोविड - 19 ची मोफत तपासणी किंवा तत्सम संदेश येत असल्यास त्यावरही क्लिक करू नये
-माहिती नसलेल्या संकेत स्थळावर तुमच्या बँकेची माहिती (खाता क्रमांक, पासवर्ड) भरू नये
-मेलवरुन सुरक्षित संभाषण करा. त्यासाठी सुरक्षित यंत्रणेचा वापर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Cyber attack