13 एप्रिल : या वर्षीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा दिवस 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोलेंनी हा निर्णय जाहीर केला असून यासोबतच, इतरही काही महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या आहेत.
14 एप्रिल रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, राज्य सरकारने आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आहे. समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोलेंनी इतरही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. डॉ. आंबेडकर यांची आठवण असलेली 50 स्थळं पर्यटनाच्या दृष्टीनं एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. राज्यातल्या बुद्ध लेण्या आणि बाबासाहेबांच्या स्फूर्तिस्थळांचा पर्यटन कॅरिडॉर म्हणून विकास केला जाणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर झाला असल्याचं बडोलेंनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.