मुंबई, 29 जानेवारी : असं म्हणतात, आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर नेहमी पडत असतो. पण हे सत्य आहे. त्यामागे शास्त्रीय कारणंही आहेत. आपण अशी अनेक जण बघत असतो, जी प्रत्येक प्रसंगात काही ना काही तक्रार करत असतात. तुम्हीही स्वत: तक्रारखोर असाल, तर याकडे लक्ष द्या. एका कंपनीनं केलेल्या रिसर्चनुसार एखादा गोष्ट मिळवायची असेल तर तुम्ही प्रयत्न करताना कमीत कमी तक्रारी करायला हव्यात.