1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खान सोबत नायिका म्हणून झळकलेली मराठमोळी अभिनेत्री 'भाग्यश्री ' आजही अतिशय तरुण आणि सुंदर दिसते.
भाग्यश्री ही महाराष्ट्रीय आहे. तिचं आडनाव पटवर्धन. तिचा जन्म 1969 मध्ये सांगली जिल्ह्यातल्या मिरजेत झाला. ती सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांच्या कुटुंबातील आहे. आता बरखास्त झालेल्या सांगली संस्थानचे राजे श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन हे तिचे वडील आहेत.
भाग्यश्री सर्वप्रथम दूरदर्शनवरील 'कच्ची धूप' या मालिकेत झळकली होती. अमोल पालेकर यांनी त्या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं.
भाग्यश्रीने हिमालय दासानीशी विवाह केला आणि लग्नानंतर तिने सर्व दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात आपला नायक पतीच असावा अशी अट ठेवली होती.
पण भाग्यश्रीची अट काही दिग्दर्शकांनी मान्य केली नाही. त्यानंतर ती 2001 मध्ये 'हेलो गर्ल्स' या चित्रपटात दिसून आली होती. तसंच भाग्यश्रीने टीव्ही मालिका' लौट आओ त्रिशा' या मालिकेतही काम केलं आहे.
भाग्यश्री सतत सोशल मीडियावर आपल्या मुलासोबत आणि पतीसोबत फोटो पोस्ट करत असते. आणि चाहत्यांकडून भाग्यश्रीच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं कौतुकही होतं.