जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दोन तेलांचं मिश्रण करेल कमाल; त्वचेच्या समस्या होती दूर, सौंदर्यही खुलेल

दोन तेलांचं मिश्रण करेल कमाल; त्वचेच्या समस्या होती दूर, सौंदर्यही खुलेल

दोन तेलांचं मिश्रण करेल कमाल; त्वचेच्या समस्या होती दूर, सौंदर्यही खुलेल

या तेलांनी (oil) मालिश केल्याने तुमच्या त्वचेला (skin) अधिक फायदा होईल.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    जाईच्या तेल खूप सुगंधित असतं. त्याचा सुगंध संपूर्ण वातावरणाला मोहक बनवतं. मात्र हे तेल केवळ केसांच्या सुगंधासाठीच वापरलं जात नाही. तर जाईच्या तेलामध्ये बरेच गुणधर्म असतात, ज्याचे आणखी बरेच फायदे आहेत. जाईचं तेल कसं उपयुक्त ठरू शकतं हे जाणून घेऊया - त्वचा आकर्षक बनवते myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, जाईचं तेल त्वचेचं सौंदर्य वाढवण्यात मदत करतं. जर बदामाचं तेल जाईच्या तेलात मिसळलं तर त्याचा फायदा दुप्पट होतो. या दोन तेलांचं मिश्रण करून त्वचेवर मालिश केल्याने त्वचेचे डाग, काळेपणा आणि कोरडेपणा दूर होतो. दररोज त्याचा वापर केला पाहिजे. यामुळे त्वचा सुंदर, आकर्षक आणि कोमल बनते. जाईच्या तेलामुळे त्वचेचं संरक्षण होतं. सांध्यातील वेदना दूर करतं जाईच्या तेलाचा वापर हाडांच्या वेदनांसाठी देखील फायदेशीर आहे. यानं नियमित मालिश केल्यानं हाडांच्या दुखण्याबरोबरच स्नायूंचा त्रासही कमी होतो. शरीराचा थकवा देखील संपुष्टात येतो. जाईच्या तेलात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. इतर तेलांमध्ये मिसळून वापरल्यास ताणदेखील कमी होतो. जाईच्या तेलाने केस होतात मजबूत myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, जाईचे तेल केसांना मुळापासून अधिक मजबूत बनवते. यासह केस गळणे किंवा दुभंगणे अशा समस्याही दूर होतात. याच्या नियमित वापरामुळे केसही काळे आणि चमकदार राहतात. केसांचं पोषण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जाईच्या तेलात जीवनसत्त्व ई भरपूर प्रमाणात आढळतं. ज्याने नैसर्गिकरित्या केस चांगले राहतात. ऊर्जा मिळते जाईच्या तेलामुळे केवळ शरीराचा थकवाच दूर होत नाही तर याने मालिश केल्याने शरीरात ऊर्जेचा संचार देखील होतो. जाईच्या तेलाने शरीराची मालिश केल्यामुळे रक्त परिसंचरण होण्यास मदत होते, हे शरीर ऊर्जावान ठेवतं. जळजळ आणि सूज देखील निघून जाते जाईचं तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यानं मालिश केल्यानं सूज येणं, खाज सुटणं किंवा जळजळ होण्यापासून आराम मिळतो. जखमेच्या उपचारांसाठी औषध म्हणून देखील जाईचं तेल प्रभावी आहे. मनशांतीसाठी चांगलं जाईचं तेल मनाला आणि मेंदूला शांती देतं आणि माणसाची नकारात्मक विचारसरणी संपवते. याचा उपयोग दररोज टाळूची मालिश करण्यासाठी केला पाहिजे. तणाव, चिंता, राग, स्मरणशक्ती कमी होणं यासारख्या अनेक मानसिक समस्यांमध्ये जाईचं तेल फायदेशीर आहे. याच्या मालिशमुळे मेंदूत रक्त संचार वाढतो, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - हरसिंगारचे फायदे, औषधीय वापर आणि सहप्रभाव न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात