कोरोनातून बरं झाल्यानंतर अश्वगंधाचा 500 मिलीग्रॅम रस किंवा एक ते तीन ग्रॅम पावडर दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यातून घ्यावी. हा उपाय 15 दिवस किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार करावा. डॉक्टारंच्या काय आणि कशी काळजी घ्यावी हेदेखील सराकरनं सांगितलं आहे. याशिवाय दिवसातून एकदा कोमट पाणी किंवा दुधातून च्यवनप्राश घ्यावं. हे वाचा - कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेले जिल्हे महाराष्ट्रात; आरोग्य सचिवांकडून इशारा कोरोनापासून बचाव करण्यासाठी किंवा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी काय करावं याबाबतही सरकारने उपाययोजना दिल्या आहेत. दिवसभर गरम पाणी प्या, ताजं आणि गरम अन्न खा, व्यायाम आणि योगा करा, हर्बल टी प्या, नाकात खोबरेल किंवा तिळाचं तेल लावा. कोरडा खोकला असल्यास पाण्यात पुदिन्याची ताजी पानं किंवा ओवा टाकून उकळून घ्या आणि दिवसातून एक वेळा या पाण्याची वाफ घ्या. खोकला आणि घशात खवखव असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा साखर किंवा मधासोबत लवंग पावडर मिसळून घ्या, अस सरकारने सांगितलं आहे.The “National Clinical Management Protocol based on Ayurveda and Yoga for the management of Covid-19” was launched by Ministers @drharshvardhan Ji and @shripadynaik Ji. You can read the protocol here: https://t.co/q4Ucz6vJKq pic.twitter.com/cxzIwzSJqD
— Ministry of AYUSH (@moayush) October 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus