नवी दिल्ली, 29 जून : देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने (Central Government) आज बुधवारी कोरोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (Covid Guidelines) बदल केले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
काय आहे पत्रात -
त्यात असे म्हटले आहे की, कोरोनाशी संबंधित सुधारित पाळत ठेवणे धोरणाची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये, संशयित आणि पुष्टी झालेल्या कोरोना रुग्णांची लवकर तपासणी, चाचणी आणि त्यानंतरच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.
राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दक्षता आवश्यक आहे. यासाठी सर्व राज्यांना सुरक्षिततेची रणनीती बनवून संसर्ग रोखावा लागेल. यासाठी लवकरात लवकर कोरोना रुग्णांची ओळख पटवणे, तत्काळ चाचणी करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या व्हेरिएंटवरही दीर्घकाळ लक्ष ठेवावे लागेल.
राज्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यापैकी काहींची आरटीपीसीआर चाचणीही केली जावी. सर्व नमुने जीनोम सिक्वेंसिंग पाठवावेत. प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याच्या आयसोलेशन आणि उपचारासाठी तातडीने लक्ष द्यावे लागेल. तसेच, यामुळे संसर्ग पसरू नये, त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे.
हेही वाचा - अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा दलाच्या तब्बल 350 तुकड्या तैनात; दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सज्ज
पत्रात पुढे म्हटले आहे की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय आणि इतर आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी. जर त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो तर त्याच्या उपचारासोबतच कोरोना पसरू नये, यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे. यासाठी वारंवार लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. मार्गदर्शक सूचनांचे सर्व जिल्ह्यांमध्ये पालन केले जावे, यासाठी व्यवस्थित व्यवस्थापन केले जावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona updates, India