जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Mahatma Gandhi Death Anniversary : 30 जानेवारी हा दिवस गांधीजींच्या पुण्यतिथीशिवाय का ओळखला जातो?

Mahatma Gandhi Death Anniversary : 30 जानेवारी हा दिवस गांधीजींच्या पुण्यतिथीशिवाय का ओळखला जातो?

Mahatma Gandhi Death Anniversary : 30 जानेवारी हा दिवस गांधीजींच्या पुण्यतिथीशिवाय का ओळखला जातो?

महात्मा गांधींच्या स्मरणार्थ भारतात 30 जानेवारी रोजी शहीद दिन (Mahatma gandhi death anniversary) साजरा केला जातो. महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध नाव आहे. त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणूनही ओळखले जाते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : मोहनदास करमचंद गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. गांधी स्मृतीमध्ये नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जाताना गांधींवर गोळ्या झाडल्या. या दिवसाची इतिहासात गांधीजींची पुण्यतिथी (Mahatma gandhi death anniversary) म्हणून कायमची नोंद झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की 30 जानेवारी हा गांधीजींच्या पुण्यतिथीशिवाय खास का आहे? चला जाणून घेऊया महात्मा गांधींच्या पुण्यतिथीशिवाय 30 जानेवारी हा दिवस का साजरा केला जातो? 30 जानेवारीला हुतात्मा दिन भारतीय 30 जानेवारी हा शहीद दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी महात्मा गांधी यांचे निधन झाले. बापूंची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करून राष्ट्र महात्मा गांधींना आदरांजली वाहते. यावेळी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाटावरील गांधींच्या समाधीवर पोहोचतात आणि गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात. यावेळी देशाच्या सशस्त्र दलातील शहीद जवानांना अभिवादन करण्यात येते. बापू आणि शहीदांच्या स्मरणार्थ देशभरात दोन मिनिटे मौन पाळले जाते. 23 मार्चच्या हुतात्मा दिनापेक्षा फरक भारतात 30 जानेवारी व्यतिरिक्त, 23 मार्च हा शहीद दिवस म्हणूनही साजरा केला जातो. दोन वेगवेगळ्या तारखांना हुतात्मा दिन साजरा करण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. पण दोन्ही हुतात्मा दिनात फरक आहे. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधींची हत्या झाली, तर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. त्यामुळे 23 मार्च रोजी अमर शहीद दिन हा अमर शहीदांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 30 जानेवारीचा इतिहास 1530: मेवाडचे राणा संग्राम सिंह यांचे निधन. 1903: कलकत्त्याच्या इंपीरियल लायब्ररीचे लॉर्ड कर्झनच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून नॅशनल लायब्ररी करण्यात आले. 1948: महात्मा गांधींची हत्या. 1971 : इंडियन एअरलाइन्सच्या फोकर मैत्री विमानाचे लाहोर येथून अपहरण करून ते नष्ट करण्यात आले. 1985: लोकसभेने पक्षांतर विरोधी कायदा मंजूर केला. 2007: एका आंतरराष्ट्रीय करारामध्ये, भारतातील दिग्गज टाटाने अँग्लो-डच स्टील निर्माता कोरस ग्रुपला 12 अब्ज बिलियन पेक्षा जास्त किंमतीत विकत घेतले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात