जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / International Women’s Day 2022: भारतातील टॉप 6 कायदे, ज्याबद्दल प्रत्येक स्त्रीला माहित असणे आवश्यक!

International Women’s Day 2022: भारतातील टॉप 6 कायदे, ज्याबद्दल प्रत्येक स्त्रीला माहित असणे आवश्यक!

International Women’s Day 2022: भारतातील टॉप 6 कायदे, ज्याबद्दल प्रत्येक स्त्रीला माहित असणे आवश्यक!

International Women’s Day 2022 : आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी लोक जगाच्या विकासात महिलांच्या संघर्षाची आणि योगदानाची कबुली देतात. महिलांसाठी एक चांगले जग बनवण्याचा संकल्प करतात. प्रत्येक स्त्रीला या 6 प्रमुख कायद्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तिला तिच्या हक्क आणि सुरक्षिततेबद्दल जागरुकता आणि जाणीव होऊ शकेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मार्च : वर्षानुवर्षे आपल्या समाजातील एक वर्ग महिलांना समाज आणि देशाच्या उभारणीसाठी अनिष्ट असल्याचे मानत आला आहे. त्यांच्या मते, स्त्रीला स्वतःची कोणतीही इच्छा किंवा स्वप्न असू नये. त्यांच्या मते समाज आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे ही महिलांची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत ज्या महिलांना समाजात पुढे जायचे आहे, त्यांच्याशी भेदभाव केला जातो. त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे स्वातंत्र्यही नसते. येथे आम्ही अशा महिलांना त्यांच्या शक्ती आणि अधिकारांबद्दल (Rights) माहिती देत ​​आहोत, ज्याच्या मदतीने त्या भेदभाव किंवा त्यांच्यावरील अत्याचारापासून स्वतःचे संरक्षण करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 8 मार्च (International Women’s Day 2022) रोजी साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला त्या 6 प्रमुख कायद्यांबद्दल (Laws) सांगणार आहोत, ज्यांची माहिती प्रत्येक महिलेला असणे आवश्यक आहे, जेणेकरून ती तिच्या अधिकार आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक (Awareness) होऊ शकेल. कार्यालयात लैंगिक हिंसा आणि छळ विरुद्ध कायदा महिलांना कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या लैंगिक हिंसाचार आणि छळापासून कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पॉश – द सेक्‍सुअल हॅरेसमेंट ऑफ विमेन एट वर्कप्‍लेस हा कायदा लागू करण्यात आला आहे. याला 3 सप्टेंबर 2012 रोजी लोकसभेत आणि 26 फेब्रुवारी 2013 रोजी राज्यसभेत मंजूरी मिळाली. तर 9 डिसेंबर 2013 रोजी लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयात, जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि जिथे महिला काम करतात अशा ठिकाणी पॉश कमिटी तयार करणे बंधनकारक करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. ते प्रकरण खरं तर भंवरी देवीचं होतं ज्या एका NGO मध्ये काम करत होत्या. कामाच्या दरम्यान त्यांच्यावर बलात्कार झाला. कायद्यानुसार कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची खात्री करणे ही संस्थेची जबाबदारी आहे. त्यांना अन्यायकारक वागणूक मिळाल्यास त्या तक्रार करू शकतात. घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 26 ऑक्टोबर 2006 रोजी भारतात लागू झाला. सर्व प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश होता. भारतातील 70 टक्के स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत आणि फक्त 10 टक्के स्त्रिया हिंसाचाराची तक्रार करतात, असा इशारा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मधील डेटा ते UN आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वारंवार देत ​​होते. भारतात असा कोणताही कायदा नाही की ज्यामुळे महिलांना घरामध्ये सुरक्षितता मिळेल. त्यामुळे 2006 मध्ये हा कायदा आला. या कायद्याची एक अत्यावश्यक बाब अशी आहे की, पीडित व्यक्तीने तक्रार नोंदवण्याची गरज नाही. एखादी महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत असल्याची भावना कोणाला असेल, तर ती पोलिसांत तक्रार करू शकते. यानंतर तक्रारीवर कारवाई करणे पोलिसांचे कायदेशीर कर्तव्य आहे.

International Women’s Day 2022: ‘त्या’ घटनेने झाली आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पायाभरणी! जाणून घ्या रंजक गोष्टी

वडिलांच्या मालमत्तेवर महिलांचा हक्क स्वतंत्र भारतात महिलांसाठी आणलेला सर्वात ऐतिहासिक आणि महत्त्वाचा कायदा म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा (2005). वास्तविक असा कायदा 1956 च्या नावाने अस्तित्वात होता. पण, यामध्ये मुला-मुलींमध्ये भेदभाव करणारे नियम होते. त्या कायद्यानुसार वडिलांच्या मालमत्तेत मुलींना हक्क नव्हता. वडिलांची सर्व मालमत्ता मुलांना मिळायची. या कायद्यात 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि 9 सप्टेंबर 2005 रोजी तो लागू झाला. नव्या कायद्यात जुना लिंगभेद रद्द करून मोठा निर्णय देण्यात आला आहे. वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना समान अधिकार देण्याची घोषणाही न्यायालयाने केली. आतापर्यंत समान मालमत्तेचा हक्क फक्त वडिलांनी मिळवलेल्या मालमत्तेलाच लागू होता. वडिलोपार्जित मालमत्ता अजूनही आपोआप मुलांच्या मालकीची होत होती. मात्र, आता नव्या कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीतही मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार देण्यात आले आहेत. हुंडा पद्धतीच्या विरोधात हुंडा बंदी कायदा, 1961 मध्ये अंमलात आला. या कायद्यानुसार भारतात हुंडा घेणे किंवा देणे हे दोन्ही कायदेशीर गुन्हा आहे. यासाठी पाच वर्षे कारावास आणि 15 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय दंड संहितेचे कलम 498A हुंडाबळी प्रकरणांना लागू होते. सुरुवातीला या कलमाशी संबंधित तरतुदी अतिशय कडक होत्या. हुंड्याची तक्रार होताच तात्काळ अटक होत होती. त्यात जामिनाची तरतूद नव्हती. 1980 च्या दशकापर्यंत हुंड्याशी संबंधित एवढ्या मोठ्या प्रमाणात चुकीची प्रकरणे न्यायालयासमोर आली की हा कायदा मागे घेण्यासाठी न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे मान्य केले. मात्र, न्यायालयाने हा कायदा मागे घेण्यास नकार दिला. तरतुदी थोड्या शिथिल करण्यात आल्या. उदाहरणार्थ, तात्काळ अटक, अजामीनपात्र गुन्हे असे नियम मागे घेण्यात आले. हुंडा बंदी कायदा (1961) हुंड्याच्या छळाचा सामना करणाऱ्या हजारो महिलांसाठी न्यायाची आशा बनला. प्रसूती रजा हा कायदा प्रत्येक काम करणार्‍या महिलेसाठी सहा महिन्यांची प्रसूती रजा सुनिश्चित करतो. यामुळे प्रसूती रजेदरम्यान तिचा नोकरीचा हक्क आणि पूर्ण पगार याची खात्री होते. हा कायदा प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी कंपनीला लागू आहे, जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. मातृत्व लाभ (सुधारणा) विधेयक 11 ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने आणि 9 मार्च 2017 रोजी लोकसभेने मंजूर केले. याचं 27 मार्च 2017 रोजी कायद्यात रुपांतर झालं. मातृत्व लाभ कायदा 1961 मध्येच अंमलात आला असला, तरी तेव्हा रजा फक्त तीन महिन्यांसाठी असायची. 2017 मध्ये ती सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गर्भपाताचा अधिकार कोणत्याही स्त्रीला गर्भपाताचा अधिकार आहे, म्हणजेच तिला हवे असल्यास ती तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा गर्भपात करू शकते. यासाठी तिला पती किंवा सासरच्या लोकांच्या संमतीची गरज नाही. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, 1971 (The Medical Termination of Pregnancy Act, 1971) अंतर्गत असे दिले आहे की गर्भधारणा 24 आठवड्यांपेक्षा कमी असल्यास स्त्री कधीही तिचा गर्भधारणा समाप्त करू शकते. विशेष प्रकरणांमध्ये, 24 आठवड्यांनंतरही एखादी महिला तिची गर्भधारणा रद्द करू शकते. (स्रोत- राष्ट्रीय महिला आयोग/टाइम्स नाऊ)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात