महिमा पुढे म्हणाली, ‘या अपघातातून मी मरता मरता वाचले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा आरशात पाहिलं, तेव्हा धक्काच बसला. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून 67 काचांचे तुकडे काढले होते. तो खूप भयानक अनुभव होता. अपघातानंतर बरेच दिवस मला घरीच राहावं लागलं. उजेडात, कॅमेऱ्याच्या लाइटमध्ये जाण्यास बंदी होती. मी स्वत:ला आरशात पाहू शकत नव्हते. त्यावेळी माझ्या हातून चित्रपटांच्या बऱ्याच ऑफर्स निघून गेल्या. अपघाताविषयी मी कोणाला फार काही सांगितलं नाही. कारण त्या काळी लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा होता. हिचा तर चेहरा खराब झाला, दुसऱ्या अभिनेत्रीला साइन करू, असं ते म्हणाले असते.’
महिमानं 2006 मध्ये बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 7 वर्षांनंतर हे दोघं वेगळे झाले. 2013 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना आरियाना नावाची एक मुलगी सुद्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood