आतापर्यंत 'तुला पाहते रे'मध्ये ईशा विक्रांतशी सर सर करत खूप प्रेमानं वागायची. विक्रांत सर म्हणजे तिच्यासाठी देवच जणू. त्याच विक्रांतचं खरं रूप ईशाला कळतं.
जालिंधरला भेटून ईशा जेव्हा माहेरी येते, तेव्हा विक्रांत तिथे येऊन बसलाय. त्याला पाहून ईशाला खूप राग येतो. कारण जालिंधरनं तिला विक्रांतच गजा पाटील असल्याचं सांगितलं असतं.
विक्रांतनं आपल्याला फसवलं, हे ईशाला जाणवतं. तिला खूप दु:ख होतं. ती सैरभैर होते. तिला काहीच सुचत नाही.
अशात विक्रांत ईशाला घरी चल म्हणून सांगतो. तेव्हा ती त्याला नाही म्हणते. त्याच्याशी खूप तुटक वागते. ते ईशाच्या आईवडिलांना खटकतं.
विक्रांत घरी एकटाच परततो. इकडे ईशा विक्रांत म्हणजेच गजा पाटील जिथे वाढला त्या चाळीत जाऊन माहिती काढायचं ठरवते.
दरम्यान, विक्रांतला एक पुरस्कारही मिळतो. विक्रांतला ईशाला गमवायचंही नाही. झेंडेंनी ईशाला मारून टाकू म्हणून सुचवल्यावर तो झेंडेंच्या अंगावर येतो.