‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अपुर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
तिनं या मालिकेत साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली. या मालिकेतील तिची मादकता पाहून अवघ्या महाराष्ट्राला वेड लागलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका संपल्यानंतर अपुर्वानं ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या मालिकेत तिनं साकारली पम्मी ही व्यक्तिरेखा देखील शेवंताप्रमाणेच लोकप्रिय ठरत होती. परंतु काही काळातच तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या मालिकेचं चित्रीकरण नगरला होतं. व ती मुंबईत राहाते. मालिकेत काम करताना तिला आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं शक्य होत नव्हतं. परिणामी तिनं या मालिकेतून काढता पाय घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
शिवाय अपुर्वाला एका ब्रेकची गरज होती. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
येत्या काळात जर तिला चांगली पटकथा असलेल्या मालिकेची ऑफर मिळाली तर ती नक्की त्यात काम करेल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
काही माध्यमांच्या मते अपुर्वाला सेटवर अपेक्षित असलेलं स्टारडम मिळत नव्हतं त्यामुळं तिनं मालिका सोडून दिली.