राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ठाकरे सरकारने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार नेमकं जाणून घ्या काय होणार बदल…
राज्यातील सर्व हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, जर त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोनाची महासाथ जाईपर्यंत बंदी आणण्यात येईल.
राज्यातील सर्व थिएटर्स मग ते सिंगल स्क्रिन असो वा मल्टिप्लेस यांना 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी आहे. कोणालाही मास्कशिवाय परवानगी नसेल. याशिवाय नागरिकांकडे लक्ष ठेवण्यासाठी तत्सम थिएटर्सने सोय करावी, असंही यात म्हटलं आहे.
लग्न समारंभांसाठीहीदेखील केवळ 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अन्यथा सभागृहाविरोधात कारवाई करण्यात येण्याचं सांगण्यात आलं आहे
याशिवाय मंदिर, धार्मिक स्थळं अन्य प्रार्थनास्थळांमध्ये जागेनुसार एका वेळी किती लोकांना प्रवेश द्यावा हे निश्चित करण्यात यावं, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.
आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीचे कर्मचारी वगळता अन्य क्षेत्रातल्या कंपन्यांनी एका वेळी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसला बोलवावं, असं या नव्या कोरोना नियमांमध्ये (new corona rules in maharashtra) म्हटलं आहे. अन्य कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावं.
राज्याने लागू केलेल्या नव्या गाइडलाइल्स 31 मार्च पर्यंत लागू असतील, असंही या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.